mooknayakvarta.com

Breaking
🔄 लोड होत आहे...

TET paper leak is a well-planned conspiracy by the state government” – Bhim Army State Vice President Satish Pawar’s scathing attack: ‘TET पेपरफुटी म्हणजे राज्य सरकारचे सुनियोजित षडयंत्र’ – भीम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांचा घणाघात

मुंबई (प्रतिनिधी): २८ जून २०२६ शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चा पेपर फुटून २.२६ लाख उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर भीम आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतीश पवार यांनी राज्य सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.

सतीश पवार नेमके काय म्हणाले?

“TET पेपर फुटणे हे राज्य सरकारचे स्पष्ट अपयश आहे. परीक्षा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून, शिक्षण क्षेत्राला मातीत घालण्याचे हे सरकारचे सुनियोजित षडयंत्र आहे,” असा गंभीर आरोप पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “NEET असो की TET, वारंवार पेपर फुटत आहेत आणि सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. गोरगरीब, बहुजन, दलित, आदिवासी घरातील मुले रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहतात. पण दलाल आणि माफियांच्या हातात प्रश्नपत्रिका देऊन सरकार त्या स्वप्नांची राखरांगोळी करत आहे. हा तरुणांच्या भविष्यासोबत खेळण्याचा प्रकार आहे.”

इशारा काय दिला?

“हा प्रकार समजदार तरुण सहन करणार नाही. आज २ लाख २६ हजार उमेदवार रस्त्यावर आले आहेत. उद्या लाखो पालक रस्त्यावर उतरतील. येणाऱ्या काळात या सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा पवार यांनी दिला.

 भीम आर्मीच्या मागण्या

१. उच्चस्तरीय SIT चौकशी करून पेपरफुटीमागील मास्टरमाइंडला तात्काळ अटक करावी.  

२. TET फेरपरीक्षा एका महिन्याच्या आत घेऊन उमेदवारांना मानसिक व आर्थिक नुकसानभरपाई द्यावी.  

३. परीक्षा यंत्रणेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायमचे निलंबित करून त्यांच्यावर MCOCA अंतर्गत कारवाई करावी.  

४. यापुढे कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्यास संबंधित मंत्री व परीक्षा मंडळ अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याचा कायदा करावा.  

राजकीय वातावरण तापले

TET पेपरफुटीवरून विरोधक आक्रमक झाले असून, भीम आर्मीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. “शिक्षणाचे बाजारीकरण करून संविधानिक हक्कांवर गदा आणली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारे सरकार आज त्यांच्याच अनुयायांच्या पोरांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे,” अशी टीका पवार यांनी केली.  दरम्यान, या प्रकरणी भिवंडीत ३ जणांना अटक झाली असली तरी, मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असल्याने सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही पवार म्हणाले.

Please follow and like us:
error20
fb-share-icon
Tweet 20
fb-share-icon20

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
WhatsApp
Copy link
URL has been copied successfully!
Scroll to Top